आजच्या काळात स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हे अनेक
युवक-युवतींचे स्वप्न आहे. मात्र व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले भांडवल
नसल्यामुळे अनेकांना स्वतःचा उद्योग सुरू करता येत नाही. हीच अडचण लक्षात घेऊन
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना (PM-AJAY – Pradhan Mantri Anusuchit Jaati Abhyuday Yojana) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना
स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.
या योजनेद्वारे ₹50,000 पर्यंतच्या व्यवसाय प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी 50% रक्कम महामंडळाकडून अनुदान (Subsidy) म्हणून दिली जाते, तर उर्वरित 50% रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते. या योजनेत अर्जदाराकडून कोणताही स्वतःचा हिस्सा (Contribution) भरावा लागत नाही, त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांनाही व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते.
Yojana & Naukri Mitra
